अमळनेर - आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या मनाविरुध्द एखादी गोष्ट घडली तर ते अशांतता व चिंतेचे कारण बनते.मानवी मनात निर्माण झालेला अहंकार हेच त्याचे मूळ कारण आहे. मात्र परिस्थिती समजून घेऊन त्यातून मार्ग काढल्यास जीवन सफल होते असे मत राजयोगिनी ब्रम्हकुमारी शिवानी दीदी यांनी ‘खुशनुमा जीवन जीने की कला’ या विषयावर बोलतांना व्यक्त केले. येथील प्रजापिता ब्रम्हकुमारीज केंद्रातर्फे आयोजित स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात त्यांनी मानवी जीवनातील विविध पैलूंवर सकारात्मक विवेचन करत जनतेला आनंदी जीवन जगण्याचा मंत्र दिला.

राजयोगिनी ब्रम्हकुमारी शिवानी दीदींच्या शुभ हस्ते ज्योत पेटवून कार्यक्रमास सुरुवात झाली. कु.आदिती लाड़ हिने सुंदर नृत्य सादर करुन स्वागत केले. यानंतर शिवानी दीदींचा मान्यवरांच्या हस्ते नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार उन्मेश पाटील, आमदार अनिल पाटील, आमदार स्मिताताई वाघ, माजी आमदार डॉ. बी.एस.पाटील, माजी आमदार साहेबराव पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, दिलीप सोनवणे,ॲड.ललिता पाटील,जयश्री पाटील,मिनाक्षी दीदी, बजरंगलाल अग्रवाल, निरज अग्रवाल व प्रजापिता ब्रम्हकुमारीजचे समन्वयक उपस्थित होते.



शिवानी दीदींचे अनमोल विचार
आपण आपल्या मनाचे मालक असून त्याचा रिमोट आपल्याच हातात आहे. तरीही दुसऱ्यामुळे आपला आनंद हिरावला जातो. साहजिकच त्यामुळे चूकीचे व्यवहार होवू लागतात. परिस्थिती म्हणजेच लोकांचा व्यवहार व मनस्थिती म्हणजे आपण. दोन्ही जण आनंद कमी होण्यास स्वत: जबाबदार आहेत. अहंकारामुळे हे सर्व घडते व अहंकारातूनच व्यवहार बंद होतात. त्यासाठी संस्कारक्षम मन असावं लागतं. आनंद हेच आपलं जीवन आहे. 
तक्रार करण्यापेक्षा परमेश्वर,मन आणि शरीर, लोक, प्रकृती यांचे आभार मानायला हवे. आभार मानल्याने आत्म्याची शक्ती वाढते. विचारधारा चांगली असण्यासाठी मी शक्तीशाली आत्मा आहे, मी नेहमी आनंदी आहे,कोणत्याही परिस्थितीत मी शांत आहे, परमेश्वर नेहमी माझ्या सोबत आहे,माझे शरीर स्वस्थ आहे, मला सर्व नाते प्रिय आहेत, माझे घर स्वर्ग आहे असे संकल्प प्रत्येकाने करावेत असे सांगितले.रोज सकाळी झोपेतून उडतांना, दिवसा दर दोन तासांनी, रात्री झोपण्यापूर्वी संकल्पांचे स्मरण करावे. जेवण करतेवेळी टीव्ही, मोबाईलचा वापर टाळावा. तसे न केल्यास त्याचा मन आणि शब्दांवर प्रभाव पडतो असेही त्या म्हणाल्या.

तक्रार करण्यापेक्षा परमेश्वर,मन आणि शरीर, लोक, प्रकृती यांचे आभार मानायला हवे. आभार मानल्याने आत्म्याची शक्ती वाढते. विचारधारा चांगली असण्यासाठी मी शक्तीशाली आत्मा आहे, मी नेहमी आनंदी आहे,कोणत्याही परिस्थितीत मी शांत आहे, परमेश्वर नेहमी माझ्या सोबत आहे,माझे शरीर स्वस्थ आहे, मला सर्व नाते प्रिय आहेत, माझे घर स्वर्ग आहे असे संकल्प प्रत्येकाने करावेत असे सांगितले.रोज सकाळी झोपेतून उडतांना, दिवसा दर दोन तासांनी, रात्री झोपण्यापूर्वी संकल्पांचे स्मरण करावे. जेवण करतेवेळी टीव्ही, मोबाईलचा वापर टाळावा. तसे न केल्यास त्याचा मन आणि शब्दांवर प्रभाव पडतो असेही त्या म्हणाल्या.

ब्रह्मकुमारी शिवानी दीदी यांचे प्रेरणादायी विचार ऐकण्यासाठी स्वामी विवेकानंद स्कूलच्या प्रांगणात खच्चून गर्दी झाली होती. सूत्रसंचालन शरद सोनवणे यांनी केले.
No comments
Post a Comment