जिल्ह्यात २ सप्टेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू

Wednesday, August 19, 2020

/ by Amalner Headlines
जळगाव - आगामी काळातील सण व उत्सव लक्षात घेता जिल्ह्यात कायदा,सुव्यवस्था व शांतता अबाधित राहण्याकरीता दि.२ सप्टेंबर २०२० पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (३) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे असे अप्पर जिल्हा दंडाधिकारी राहुल पाटील  यांनी कळविले आहे.
          हे आदेश लग्न मिरवणुका, धार्मिक मिरवणुका, प्रेतयात्रा यांना लागू असणार नाहीत असेही अप्पर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी आदेशात म्हटले आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines