----------------------------------------------------------------------
जळगाव - जिल्ह्यात जे नागरिक बाहेर गावावरून आलेले आहेत व ज्यांचा चौदा दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपलेला नाही असे नागरिक बेकायदेशीर बाहेर फिरतांना आढळून आल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा इंन्सीडंट कमांडर गोरक्ष गाडीलकर यांनी जिल्ह्यातील संबंधित यंत्रणेला दिले आहेत.नागरिक निष्काळजी
जिल्ह्यांमध्ये कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, रुग्णांची संख्या नियंत्रित करण्यासाठी व साथीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सर्वस्तरावरून प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून या कालावधीत जे बाहेर गावावरून नागरिक आपल्या जिल्ह्यात आलेले आहेत. त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. परंतु काही ठिकाणी असे निदर्शनात आले की, काही नागरिक त्यांच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारलेला असतांना सुद्धा घरी न राहता इतरत्र फिरत आहेत हे अतिशय गंभीर आहे.
अचानक तपासणी करण्याचे निर्देश
जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता जेनागरिक बाहेर गावावरून आलेले आहेत व ज्यांचा चौदा दिवसांचा होम क्वारंटाईनचा कालावधी संपलेला नाही अशा नागरिकांची अचानक तपासणी करावी. जे नागरिक बेकायदेशीर बाहेर फिरतांना आढळून येतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करुन त्याचा अहवाल सादर करण्याचे निर्देशही श्री.गोरक्ष गाडीलकर यांनी दिले आहेत.
No comments
Post a Comment