--------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
अमळनेर - कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर देशात दि.१ जून पासून अनलॉक -१ सुरू झाले आहे. आधी अमळनेर तालुक्यातील कोरोनाचे रूग्ण कमी झाले होते पण पुन्हा रूग्ण संख्या वाढू लागली आहे.त्यामुळे प्रशासन व लोकप्रतिनिधींनी दि.६ जून पर्यंत जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र अमळनेरकर पुर्वीसारखेच रस्त्यावर उतरले असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासन वारंवार सुचना देत आहे पण त्याकडे कानाडोळा करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच काही दुकानदारांनी आज आपली दुकाने उघडली.मालाची विक्री करतांना जमावबंदी आदेशाचे उल्लंघन व सोशल डिस्टन्सींगचे पालन न केल्यामुळे प्रशासनाने कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यात केवळ जीवनावश्यक वस्तूंचीच दुकाने निर्धारित वेळेत सुरू ठेवण्याचे निर्देश असून त्या नियमांचे व्यापारी व नागरिकांनी पालन करावे असे आवाहन शासनाच्या वतीने करण्यात आले आहे. आज (दि.४ रोजी) सकाळी १०:३० ते दुपारी ३ वाजेच्या दरम्यान शहरातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी तहसिलदार मिलिंद वाघ,नपाच्या मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड,प्रशासन अधिकारी संजय चौधरी हे अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल व कर्मचारी यांच्यासह शहरातील बाजार पेठ,बस स्टँड रोड, कुंटे रोड व इतर व्यापारी भागात पाहणी करीत असतांना त्यांना नियमांचे उल्लंघन करून बेकायदेशीरपणे काही दुकाने उघडल्याचे व तेथे सोशल डिस्टन्सींगचे पालन न करता गर्दी जमा करून वस्तूंची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्याने सदर १४ दुकान मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या दुकान मालकांवर गुन्हा दाखल
रवि ट्रेडर्स,सेवक जनरल स्टोअर्स,मनोकामना साडी सेंटर,जैन एम्पोरियम,मनोज गिफ्ट हाऊस,गांधी स्टोअर्स,श्याम शुज सेंटर,गुरूनानक साडी सेंटर,साबीर सेल्स,अॅप्पो मोबाईल,शिवसागर प्लॅस्टिक,आशु मेन्स वेअर,विजय फरसाण,हॉटेल पुष्कराज या दुकान मालकांवर अतिक्रमण विभाग प्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि कलम १८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पो.ना.सुनिल हटकर हे पुढील तपास करीत आहेत.
No comments
Post a Comment