-------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
अमळनेर - अमळनेर विधानसभा मतदार संघातील वाघोदे येथील शेतकरी व शेतकी संघाचे माजी संचालक श्रीराम पाटील व चिखलोड बु.॥ येथील शेतकरी वाल्मिक मधुकर पाटील यांच्या शेतातील विजेचे खांब नुकत्याच झालेल्या वादळात पडलेले होते.या शेतक-यांनी आपली समस्या माजी आमदार साहेबराव पाटील यांना सांगितली. मा.आ.पाटील यांनी विजवितरण कंपनीला स्वतः मजुरी देऊन वादळात पडलेले वीजेचे खांब पुन्हा उभे करण्यास मदत केली. या मदतीबद्दल गौरव त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे. या बाबतची अधिक माहिती अशी की,मतदार संघात गेल्या वीस दिवसापूर्वी झालेल्या वादळात पारोळा तालुक्यातील चिखलोड व अमळनेर तालुक्यातील वाघोदे येथे पावसामुळे खांब कोसळले होते. चिखलोड येथील वाल्मिक पाटील यांच्या शेतातील तब्बल पाच वीज पोल पडले होते. महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या मागे ते वीस दिवसापासून पाठपुरावा करत होते पण महावितरणच्या एकही कर्मचाऱ्यांने देखील लक्ष दिलं नाही.तर वाघोदे येथील श्रीराम पाटील यांच्या शेतशिवारात इतर शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांना पाणी नव्हते दोघांनी शेवटी माजी आमदार साहेबराव पाटील यांना संपर्क साधला त्यांनी त्या शेतकऱ्यांची समस्या जाणून घेत महावितरण कंपनीच्या मजुरांसोबत संपर्क साधला. माजी आमदार पाटील यांनी वाघोदे येथे ७ हजार रुपये व चिखलोड येथे ५ हजार रुपये असे १२ हजार रुपये मजुरांना स्वतः देत अवघ्या दोनच तासात त्यांच्या समस्याचे निवारण केले आणि त्यांचा वीज पुरवठा सुरळीत सुरू करून दिला. वाघोदे व चिखलोड शिवारातील शेतकरी व तक्रार करण्याऱ्या शेतकऱ्यांच्या वतीने माजी आमदार साहेबराव पाटील यांचे आभार व्यक्त करत त्यांनी असा जनतेचा संवेदनशील नेता पुन्हा अमळनेर नगरीला प्राप्त व्हावा असे उद्गार काढले.
No comments
Post a Comment