आज अंबरीश ॠषींचा यात्रौत्सव यात्रेचा आनंद घ्या पण जबाबदारीची जाणीव ठेवा - आवाहन

Monday, July 11, 2022

/ by Amalner Headlines


अमळनेर -  तालुक्यातील तमाम नागरिकांना कळविण्यात आम्हाला आनंद होत आहे की, संताच्या वास्तव्याने प्रसिद्ध व पावन झालेल्या तसेच प्रती पंढरपुर म्हणुन ओळख असलेल्या अमळनेर नगरीतील श्री.अंबरीष ऋषि महाराज टेकडीवरील यात्रा उद्या द्वादस आषाढ शु.१२ शके १९४१ संवत २०७४, दिनांक ११/७/२०२२. सोमवार रोजी संपन्न होणार  आहे. या यात्रेत नागरिकांनी आनंदाने सहभागी व्हावे पण टेकडीवर निर्माण केलेल्या निसर्ग संपदेचे नुकसान होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे 
कोण होते अंबरीश ॠषी
श्री.अंबरीषजी ऋषि हे मोठ्या कुल घराण्यातील १६ वे गादीपुरुष राजा होते. ते दंडयोग तपश्चर्यासाठी हिमालय पर्वतात गेले. त्यांनी तपश्चर्या झाल्यानंतर त्यांनी अमळनेर येथील टेकडीच्या जवळपास ४० /५० एकर पठारावर जपतप तपश्चर्या करुन श्रीहरी विष्णु देवता व शिवशंकर देवतांची आराधना करुन टेकडी पावन,शुद्ध तसेच स्वर्गमय केली आहे. हेच पावित्र्य आपणांस सुद्धा जोपासायचे आहे.

टेकडी गृपने निर्माण केलेली निसर्ग संपदा
     
आपणांस कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की अमळनेर येथील श्री.अंबरीषजी ऋषि महाराज टेकडीवर 
मा.आयकर आयुक्त श्री.संदिपजी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाने श्री. अंबरीष महाराज टेकडी ग्रुपने टेकडी परिसरात वृक्ष लावणे व जगवणे तसेच चारी खणुन पाणी जिरविण्याचे व ड्रमच्या ( कँन ) सहाय्याने टेकडी परिसराच्या कानाकोप-यापर्यंत वृक्षांना पाणी देण्याचे कार्य हे श्रमदानातुन व लोकसहभागातुन टेकडी ग्रुप करत आहे. आजवर टेकडी परिसरात जवळपास ३५००० वृक्षारोपण केले आहे. तसेच त्या वृक्षांना पाणी देणे त्यांची निगा ठेवणे व त्यांना जगवणे हे पर्यावरणाला पोषक व सृष्टि साठी महत्वपूर्ण तसेच हे एक दैवी कार्य हे करत आहे. 
विक्रमी वृक्षारोपण
    दिनांक ८ जुलै २०१८, रविवार रोजी सकाळी ११ वाजून ११ मिनिटांनी अंबरिष  टेकडीवर १ मिनिटात १,१११ वृक्षारोपणाचा आदर्श पर्यावरणपूरक अभिनव राष्ट्रीय उपक्रम जनतेच्या सहकार्यातून करण्यात आला. अंबरिष टेकडीवर आजपर्यंत शेकडो झाडे लावून ती वाढविण्यात आली आहेत. त्यामुळे अंबरिष  टेकडीचे रूप  बदलून टेकडीचे नैसर्गिक सौंदर्य वाढण्यास मदत झाली आहे.

यात्रेकरूंना आवाहन
       सर्व यात्रेकरूंना कळकळीची विनंती आहे की, आपण टेकडीवर यात्रेला किंवा यात्रेनंतर कधीही आल्यावर नास्ता किंवा जेवण केल्यावर उरलेले अन्न व कागद,युज & थ्रो काही वस्तु, रद्दी पेपर अश्या वस्तु इकडे तिकडे न फेकता आपण आणलेल्या कॅरीबॅग/ पिशवीत भरुन श्री.अंबरीषजी ऋषि महाराज टेकडी ग्रुप सदस्यांकडे जमा करावी किंवा श्री.अंबरीषजी ऋषि महाराज मंदिरा जवळच मोठा ओटा आहे त्याच्या मागील बाजूस नेऊन टाकावी.
     श्री.अंबरीषजी महाराज टेकडी परिसरात टेकडी ग्रुपने वृक्षारोपण केले आहे. तरी आपणास नम्र विनंती आहे की आपण आपआपली वाहने  टेकडीच्या खालील बाजुस लावावी. आपण या परिसरात वावरतांना आपल्यामुळे वृक्षांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी.
      टेकडीच्या खाली पाय-यां जवळ व टेकडीच्या द-यांमध्ये सी.सी.टी. अंतर्गत बंधारे खोलीकरण पाणी अडविण्यासाठी काम सुरु आहे. तरी आपण काळजी पुर्वक लक्ष ठेवून सावधगिरी बाळगावी. तसेच जेथे पाण्याचा साठा असेल तेथे कृपया जाऊ नये किंवा पाण्यात उतरु नये ही नम्र विनंती.
       असे आवाहन मंदीर संस्थान व टेकडी गृपच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines