हतनूरच्या आवर्तनाचे पाणी जळोद डोहात पोहोचले माजी आमदार व मुख्याधिकारी यांनी केले जलपूजन

Thursday, May 21, 2020

/ by Amalner Headlines
-------------------------------------------------------
          - * जाहीरात * -
---------------------------------------------------------------------------
अमळनेर - दि.१७ मे रोजी हतनूर धरणातून सोडलेल्या पहिल्या आवर्तनाचे पाणी आज जळोद डोहापर्यंत पोहोचल्याने  तापी नदीचे पात्र तुडुंब भरले आहे. आज  माजी आमदार साहेबराव पाटील व नपाच्या  मुख्याधिकारी डॉ.  विद्या गायकवाड यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. या आवर्तनामुळे अमळनेर शहरात उन्हाळ्यात आणि कोरोनाच्या विषाणूपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना पुरेसे पाणी मिळणार आहे
        अमळनेर शहराला जळोद येथून तापी नदीवरून पाणी पुरवठा होत असतो. जळोद डोह आटल्यामुळे नागरिकांना उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होऊ नये म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांनी हतनूरचे पहिले आवर्तन घेण्याची सूचना मुख्याधिकारींना दिली होती. त्यानुसार नगरपालिकेने राखून ठेवलेल्या तीन आवर्तनापैकी एक आवर्तन घेण्यात आले. गिरणा पाटबंधारे विभागाने १७ मे रोजी सायंकाळी ५ दशलक्ष घनमीटर पाणी अमळनेर शहरासाठी पाटचारीतून सोडले होते. चार दिवसांनी १०५ किमीचा प्रवास करून पाणी जळोद डोहापर्यंत पोहचल्यानंतर माजी आमदार साहेबराव पाटील , मुख्याधिकारी डॉ. विद्या गायकवाड यांनी जलपूजन केले.  यावेळी प्रशासन अधिकारी संजय चौधरी,पाणीपुरवठा अभियंता हर्षल सोनवणे,बाबू साळुंखे , रवींद्र पाटील हजर होते
पाणी जपून वापरा-नगराध्यक्षांचे आवाहन
     
पहिल्या आवर्तनचे पाणी जून महिन्याच्या अखेरपर्यंत पुरणार आहे. नागरिकांनी अंगणात सडा टाकणे,वाहने धुणे यासाठी पाण्याचा अपव्यय न करता कोरोना पासून बचाव करण्यासाठी वारंवार साबणाने हात धुण्यासाठी,बाहेरून आल्यास आंघोळ करण्यासाठी  वापरावे. नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी पुरेसे पाणी पुरवण्याचे नियोजन आहे तरी पाण्याचा जपून वापर करावा.
          *-पुष्पलता पाटील,*
           नगराध्यक्षा,अमळनेर
---------------------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines