-------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
अमळनेर - लॉकडाऊन- ४ मध्ये राज्य शासनाने वाहन धारक नागरिकांसाठी नवीन निर्देश जारी केले आहेत. अमळनेर शहरात नागरिकांनी या नियमांचे पालन करावे यासाठी माजी आमदार कृषीभुषण साहेबराव पाटील यांनी स्वतः रस्त्यावर उतरून अत्यावश्यक कामाशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडूच नये असे आवाहन केले.काय आहेत नवीन नियम
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने १० मे २०२० च्या आदेशानुसार नुकतेच वाहन धारकांसाठी ३१ मे पर्यंत नवीन नियम निर्गमित केले आहेत.

त्यात दुचाकी साठी सिंगल सीट,तीन चाकी रिक्षासाठी चालकासह ३ सीट,चार चाकी वाहनांसाठी चालकासह ३ सीट असे वाहन धारकांसाठी नियम घालून दिले आहेत.
जनता कर्फ्युतही नियमांचे उल्लंघन

अमळनेर शहरात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने २२ मे अखेर पर्यन्त कडकडीत बंद पुकारला असला तरी नागरिक मात्र एवढ्या कडकडीत बंद मध्येही कामाशिवाय घरा बाहेर निघत असून शासनाने नव्याने निर्गमित केलेल्या नियमांचे उल्लंघन करतांनाही दिसले. पोलिसांसह माजी आमदार साहेबराव पाटील हे स्वतः रस्त्यावर उतरून बेजबाबदारपणे वाहन चालवून कायदे मोडणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहन धारकांना थांबवून नागरिक शासनाच्या नियमांची पायमल्ली कशी करताहेत याबाबतीत पटवून देत होते. नागरिकांनी कडकडीत बंद मध्ये शासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास वाहन प्रतिबंधक कायद्याच्या कलम १८८ नुसार प्रशासनाकडुन कडक कार्यवाही करण्यात येईल म्हणून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये,घरीच थांबावे व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जे वाहन प्रतिबंध कायद्यानुसार नवीन नियम घालून दिले आहेत त्याचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन माजी आमदार साहेबराव पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
No comments
Post a Comment