आरोग्य अधिकारी व प्रशासनाची सुचना - अमळनेरात अजून तीन दिवस जनता कर्फ्यु अजून तीन दिवस जनता कर्फ्यु स्वयंस्फूर्तीने पाळा-आ.अनिल पाटील यांचे आवाहन पाच दिवसाच्या यशस्वी जनता कर्फ्युमुळे कोरोना साखळी खंडीत झाल्याचा दावा

Monday, May 11, 2020

/ by Amalner Headlines
---------------------------------------------------------------------------
              - * जाहीरात * -
------------------------------------------------------------------------
अमळनेर -
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अमळनेर तालुक्यात दि. ७ मे पासून जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन केले होते. तालुक्यातील जनतेने  संपूर्ण पाच दिवस घरात थांबून जनता कर्फ्यु १०० टक्के यशस्वी केल्याने कोरोना संपर्काची साखळी खंडीत करण्यात  बऱ्यापैकी यश आलेले आहे,मात्र अजूनही साखळी पूर्णपणे खंडीत झाली नसल्याची शक्यता आहे.त्यामुळे प्रशासनातील अधिकारी आणि आरोग्य विभागाचे अधिकारी व डॉक्टर्स यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आणि त्यांच्या निरीक्षणानुसार उद्यापासून पुढील तीन दिवस याच पद्धतीने दि.१२ ते १४ मे पर्यंत जनतेने स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्युस प्रतिसाद द्यावा असे आवाहन आ.अनिल भाईदास  पाटील यांनी केले आहे.
जनता कर्फ्यु लाभदायकच
        आ.अनिल पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार नागरिकांनी दि. ७ मे पासून पाच दिवस जनता कर्फ्युस उत्स्फूर्त  प्रतिसाद दिला. या कालावधीत   किराणा,भाजीपाला व मेडिकल दुकाने देखील बंद असल्याने  कोणीही नागरिक रस्त्यावर दिसून आले नाही त्यामुळे जनता कर्फ्यु १०० टक्के यशस्ची झाला.या कर्फ्यु चा कालावधी काल पूर्ण झाल्यानंतर अत्यावश्यक सेवा पूर्ववत सुरू होणार का याबाबत नागरिकांत संभ्रम होता. पण यासंदर्भात आ.अनिल पाटील यांनी प्रशासन आणि आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. या कर्फ्युचा मोठा फायदा झाल्याचे अधिकारी वर्गाने  सांगितले व याच पद्धतीने अजून तीन दिवस हा कर्फ्यु पाळला गेल्यास ही साखळी पूर्ण खंडीत   झाल्याशिवाय रहाणार नाही असा विश्वास व्यक्त केल्याने जनता कर्फ्यु दि.१२ पासून पुढे अजून तीन दिवस कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आ.पाटील यांचे आवाहन
          मागील पाच दिवस नागरिकांनी जो संयम ठेऊन प्रतिसाद दिला तो कौतुकास्पद आहे.तसाच प्रतिसाद अजून तीन दिवस दिल्यास निश्चितपणे ते आपल्या आणि शहराच्या हिताचे राहणार आहे.त्यासाठी अजून थोडा त्रास सहन करा,लवकरच आपल्या भूमीला पूर्वीप्रमाणेच सुगीचे आणि आनंदाचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही.हा जनता कर्फ्यु आपल्यावर कुणीही लादलेला नसून तो आपण आपल्यासाठीच स्वयंस्फूर्तीने पाळणार आहोत.यादरम्यान अत्यावश्यक सेवा देखील बंदच ठेवाव्या लागतील यासाठी संबंधित व्यावसायिकांनी देखील सहकार्य करावे. कुणीही पुढील तीन दिवस घराबाहेर न निघता घरातच सुरक्षित राहावे असे मी तालुक्यातील नागरिकांना आवाहन करत आहे. 
      - आ.अनिल पाटील

---------------------------------------------------------------

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines