------------------------------------------------------------------------
------------------------------------------------------------------------
अमळनेर - तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. नागरिकांमध्ये कोरोना बाबत भीतीयुक्त वातावरण आहे. कोरोना संशयित रूग्णांच्या जवळपास जाण्याचीही कुणाची तयारी नसते असे प्रसंग घडत असतांनाच या संकटातही आपल्या तालुक्यातील जनतेला आधार देण्याचं काम अमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याकडून केले जात आहे. आज वटपौर्णिमेच्या दिवशी देखील माझे अमळनेर शहर व तालुका कोरोनामुक्त करणारच हा ध्यास मनात घेऊन ते कार्यरत आहेत. तसा विश्वास ते आपल्या कृतीतून नागरिकांना देत आहेत. आमदारांचे कोविड सेंटरला भोजन
आज वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरच्या पुरणपोळीच्या जेवणाचा आस्वाद न घेता आमदार अनिल पाटील यांनी सरळ कोविड केअर सेन्टरला भेट देऊन जे अन्न तेथील रूग्णांना दिले जात आहे ते मागवून त्या जेवणाचा आनंदाने आस्वाद घेतला.आपण आपल्या लोकांना संकटात एकटे न सोडता त्यांच्या सोबत आहोत हीच भावना आमदारांनी त्यातून दाखवून दिली.

तपासणी शिबीर ठरले उपयोगी
खरं तर अमळनेर तालुक्यातील मुंगसे या गावात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हा पासून तर आज पर्यत आमदार अनिल पाटील यांनी पायाला भिंगरी लावुन कामाला गती देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच आपल्या भूमीपुत्रांसाठी आमदार अनिल पाटील यांनी स्थानिक डॉक्टर्स व आय.एम.ए. संघटना यांना सोबत घेऊन सर्दी, ताप, खोकला आजाराचे शिबीर दि.२६ मार्च २०२० पासून ७ दिवस सर्व उच्चशिक्षित डॉक्टर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केले. यात फक्त अमळनेर तालुकाच नाही तर शेजारच्या चोपडा, पारोळा,धरणगाव ह्या तालुक्यातील १००० पेक्षा जास्त नागरिकांनी सर्दी,खोकला तपासणी करून उपचार घेतले. तसेच शहरातील प्रसृतीतज्ञ डॉक्टरांनासुद्धा आमदारांनी आवाहन करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेवा देण्यासाठी आग्रह व विनंती केली. सर्व डॉक्टरांनी आमदारांच्या विनंतीला मान देऊन त्यांच्या खाजगी रुग्णालयात मोफत प्रसृती सेवा देण्याचा निर्धार केला.
तालुका स्तरावर कोविड रुग्णालय
कोरोनाचा संसर्ग सर्वदूर पसरत होता तर अमळनेरमध्ये रूग्ण संख्येचे शतक पार झालेलं होते. अशावेळी प्रशासनाला सोबत घेऊन अमळनेरलाच कोविड केंअर सेन्टरची निर्मिती केली व जिल्ह्यात तालुकास्तरावर पहिलं सेन्टर अमळनेरला उभारलं. त्यामुळे जळगावला येण्या-जाण्याचा होणारा रुग्णांचा त्रास त्यातून खूप कमी झाला. आपल्याच स्थानिक आरोग्य अधिकारी व खाजगी डॉक्टर्स यांच्या मार्गदर्शनाने त्याला यशही आल्याचे दिसून आले. आजपर्यंत एकूण ९७ पेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात यश आले आहे. भूमिपुत्र आमदार अनिल पाटील यांनी तत्परतेने व प्रशासनाच्या मदतीने जनतेला सर्व सोयी सुविधा देखील मिळवून दिल्या आहेत. तसेच नागरिकांनी देखील वेळोवेळी पुकारण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला पाठिंबा दिला असून अमळनेर तालुका लवकरच पूर्वपदावर येईल ही आशा मनात घेऊन आमदार अनिल पाटील यांचं काम आजही सुरू आहे.
No comments
Post a Comment