---------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------
अमळनेर - शहरात दुस-यांदा लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन नंतर जनजीवन सुरळीत करण्यासाठी शासनाने काही नवीन निर्देश जारी केले होते. त्यानुसार शहराच्या बाजार पेठेत जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने " नो व्हेईकल झोन " घोषित करण्यात आले होते. वाहने जाऊ नयेत म्हणून त्याठिकाणी बॅरॅकेटस् लावण्यात आले होते. पण आता व्यापारी व नागरिकांनी या नियमांचे बिनधास्तपणे उल्लंघन केले असून जिल्हाधिका-यांच्या आदेशाला खो दिला असल्याचे दिसून येत आहे. दररोज सुचना देऊन व कारवाई करूनही व्यापारी व नागरिक ऐकत नसल्याने आता स्थानिक प्रशासनही हतबल झाल्याचे दिसून येत आहे. प्रशासनाने कठोर भुमिका घेऊन या नियमांचे उल्लंघन करणा-यांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे. " नो व्हेईकल झोन " चा फज्जा
कोरोना आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने काही नवीन नियम लागू केले.त्यात शहरातील बाजारपेठ व त्यास जोडणारा मुख्य रस्ता यास "नो व्हेईकल झोन " घोषित करण्यात आले. अमळनेर शहरात लालबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स,शिवाजी मार्केट (गंगा घाट), पाणी टाकी रस्ता, मोठी बाजारपेठ,पोस्ट ऑफिस चौक या भागात मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने तेथे नो व्हेईकल झोन घोषित केला.त्यामुळे तेथे बॅरॅकेटस् लावण्यात आले. पण काही स्थानिक व्यापा-यांनी या बॅरॅकेटस् काढून टाकल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे प्रशासनाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन होत असून वाहन धारक अतिशय बिनधास्तपणे वाहन चालवत असल्याचे दिसून येत आहे. दररोजच्या कारवाईला कंटाळून आता प्रशासन हतबल झाले आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. शासनाने नागरिकांना अत्यंत महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नये. घराबाहेर पडतांना मास्क वापरणे,सोशल डिस्टन्सींगचा वापर करावा व सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये या सुचना दिल्या आहेत. पण आजही सार्वजनिक ठिकाणी स्थिती पाहिली तर काही लोकांनी हे नियम अक्षरशः धुडकावून लावले आहेत. वाहन धारक नो व्हेईकल झोनमध्ये सुसाट वाहन चालवत आहेत. प्रशासनाने या वाहन धारकांना कारवाईचा ब्रेक लावण्याची गरज आहे.
दुकानदारांवर कारवाई
बाजारपेठेत नियमांचे उल्लंघन करणा-या काही दुकानदारांवर काल कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. यात एका कृषी केंद्रास ५०० रुपये तर दोन भाजी विक्रेत्यांना प्रत्येकी २०० रुपये दंड ठोठावला आहे. दुकानदारांनी नियमांचे पालन करावे. प्रशासनाने दुकाने उघडण्याबाबत सकाळी ९ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत ही वेळ दिलेली आहे. काही दुकानदार या वेळेनंतरही दुकाने सुरू ठेवत असल्याचे दिसून येत आहे. या दुकानदारांवर कारवाई होऊ शकते. त्यामुळे व्यापारी व नागरिकांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
No comments
Post a Comment