अमळनेर - तालुक्यात मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळाली नाही.नुकसान भरपाईचे अनुदान तातडीने वितरित करण्यात यांवे अशी मागणी मा.आ.स्मिता वाघ यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे व कृषी मंत्री ना.दादा भुसे यांच्या कडे केली.
तालुक्यात मागील वर्षी मारवड,वावडे,अमळगांव,पातोंडा ह्या महसूली मंडळातील ५२ गांवामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती. या अतिवृष्टित सुमारे १९४१३.२६ हेक्टर जमिनीवरील शेती पिकांचे व फळ पिकांचे नुकसान झाले होते.राज्य विधिमंडळाच्या नागपुर अधिवेशन कालावधीत मा. आ.स्मिता वाघ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी अशी मागणी केली होती.अद्यापही आर्थिक नुकसान भरपाई अनुदान मिळाले नसल्याने मा.आ.स्मिता वाघ यांनी राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांच्याकडे इ-मेल द्वारे नुकसान भरपाई मिळण्याची मागणी केली आहे.
दरम्यान लवकरच मदत वितरित करण्यात येणारअसल्याचे राज्याचे कृषी मंत्री ना.दादा भुसे यांनी आश्वासन यांनी दिले आहे.
No comments
Post a Comment