अमळनेर : येथील मतदारांनी चांगल्या नेतृत्वाची निवड करून अमळनेरचा आवाज विधानसभेत पोहचविण्याचा जो निर्णय घेतला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आली आहे. अहिराणी भाषा समजली नाही तरीही अमळनेरच्या महिलांच्या भावना समजल्या. अनेकांनी शरद पवारांची साथ सोडली मात्र बळीराजा टिकण्यासाठी आणि लोकशाही जीवंत राहण्यासाठी शरद पवारांच्या लढ्याला साथ देणाऱ्या मावळ्यांचे आणि महिलाचे ऋण व्यक्त करण्यासाठी आले आहे. समाजाभिमुख कामे करा , महिला सक्षमीकरण करायचे आहे , मात्र समाजकारण आणि राजकारण करताना पोटासाठी उद्योग करणेही आवश्यक आहे. म्हणून बचत गटांच्या माध्यमातून विविध उत्पादने तयार करा त्याला बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाईल , महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न घेऊन शाळा, महाविद्यालयात महिला कार्यकर्त्यानी संपर्क करावा.
राष्ट्रवादी काँग्रेस कडून शाळांमध्ये तक्रार पेट्या लावा , स्वच्छ नदी अभियान राबवा , महिलांवर अत्याचार करणारे जवळचे असतात त्यामुळे महिलांना जागृत करण्याचे काम करा , मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करा.बलसाने जिल्हा धुळे येथे तलाठ्यानी पंचनामा व्हाट्स अप ग्रुप करून पंचनामे केले हा प्रकार विचित्र वाटला , शेतकरीकडे अँड्रॉइड मोबाईल नाही पंचनाम्यासाठी कर्मचारी बांधावर गेला पाहिजे , मिळालेली मदत तुटपुंजी आहे राष्ट्रवादी कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या बांधावर दिसला पाहिजे , राजकारण निवडणुकीपूरता आहे इतरवेळी आपण जनतेचे सेवक आहोत हे लक्षात ठेवा असे आवाहनही त्यांनी केले
राष्ट्रवादी काँग्रेस कडून शाळांमध्ये तक्रार पेट्या लावा , स्वच्छ नदी अभियान राबवा , महिलांवर अत्याचार करणारे जवळचे असतात त्यामुळे महिलांना जागृत करण्याचे काम करा , मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करा.बलसाने जिल्हा धुळे येथे तलाठ्यानी पंचनामा व्हाट्स अप ग्रुप करून पंचनामे केले हा प्रकार विचित्र वाटला , शेतकरीकडे अँड्रॉइड मोबाईल नाही पंचनाम्यासाठी कर्मचारी बांधावर गेला पाहिजे , मिळालेली मदत तुटपुंजी आहे राष्ट्रवादी कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या बांधावर दिसला पाहिजे , राजकारण निवडणुकीपूरता आहे इतरवेळी आपण जनतेचे सेवक आहोत हे लक्षात ठेवा असे आवाहनही त्यांनी केले
जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील म्हणाल्या की, राज्याचे नेतृत्व स्वीकारताच रुपाली चाकणकरानी महाराष्ट्र पिंजून काढला आणि महिलांमध्ये नवी प्रेरणा दिली. अमलनेरची निवडणूक जनतेची होती
कल्पना पाटील म्हणाल्या की, अमळनेर तालुक्यातील महिला संघटन चांगले आहे.अन्य नेते पक्ष सोडून जात असताना महिला मात्र टिकून राहिल्या
यावेळी नंदुरबारच्या जिल्हा कार्याध्यक्षा करिष्मा पाटील , योजना पाटील , रिटा बाविस्कर ,
आशा शिंदे , शबनम शेख , ज्योती पाटील, छाया गवळे , भावना देसले यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.
आमदार अनिल पाटील म्हणाले की,राज्य मंत्रीमंडळाचा शपथ विधी होण्याच्या आधीच रुपाली चाकणकारांनी अमळनेर येथे भेटीचा शब्द पाळला. त्यांच्या आवाहनानुसार सकाळी ११ वाजेपर्यंत ४५ टक्के पर्यंत मतदान महिलांचे मतदान झाले होते. माझ्या मंत्री पदापेक्षा रुपाली चाकणकराना विधानपरिषदेत घ्यावे असे मला वाटते.वयाच्या 80 व्या वर्षीही शरद पवार साहेब जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी वणवण भटकत आहेत त्यामुळे महिलांनी रुपाली चाकणकर यांच्या पाठीशी राहून पक्ष बळकट करावे असे आवाहन ही त्यांनी केले
यावेळी व्यासपीठावर आमदार अनिल पाटील, जिल्हाध्यक्षा कल्पनाताई पाटील, जिल्हा सरचिटणीस मीनल पाटील, प्रदेश उपाध्यक्षा मंगला पाटील, प्रदेश सरचिटणीस रंजना देशमुख, मीनाक्षी चव्हाण, जिल्हा बँक संचालिका तिलोत्तमा पाटील, जि. प. सदस्या जयश्री पाटील, रिता बाविस्कर, योजना पाटील, आशा चावरीया, अलका पवार, अश्विनी पाटील, शीला पाटील, कविता पवार,करुणा सोनार, संगीता लोहार, शोभा चव्हाण, उषाबाई पवार गंगापुरी, रंजनाबाई भिल सडावण, निसर्डी सरपंच वैशाली पाटील, अंतुर्ली रंजाणे सरपंच शीतल पाटील, गुजराथी महिला मंडळ अध्यक्षा विजया जैन, निलाबाई भिल(कुर्हे),प्रबोधिनी सोनवणे(कुर्हे), मंगलाबाई ज्ञानेश्वर पाटील (टाकरखेडा), हर्षदा पाटील आदींची उपस्थिती होती.
No comments
Post a Comment