अमळनेर दगडी दरवाजाच्या दुरूस्तीचे काम एप्रिलमध्ये सुरू होणार मुरूम गोण्या काढून रस्ता मोकळा करणार-खा.उन्मेश पाटील

Monday, December 2, 2019

/ by Amalner Headlines

अमळनेर -
शहरातील दगडी दरवाजाच्या पडलेल्या बूरूजामूळे भविष्यात मानवहानी होवू नये म्हणून घाट रस्त्यावर ज्या पध्दतीने साखळी चैन रिलींगचे काम होते तसे काम येत्या ४ दिवसात सूरू करण्यात येणार असून सध्या लावलेल्या मूरूमाच्या गोण्या काढून रहदारीस रस्ता मोकळा करण्यात येईल अशी माहिती खा. ऊन्मेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. या संबधी आपण पूरातत्व विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले असून त्यासाठी तात्पूरता लागणारा निधी खासदार निधी अथवा जिल्हा नियोजन समितीकडून ऊपलब्ध करून देणार आहोत. नासिक पूरातत्व विभागाचे अधिकारी विराट सोनटक्के यांचेशी संपर्क केला.

 राज्याच्या पूरातत्व विभागाकडील चालू वर्षातील बजेटमधील निधीत ३० टक्के आर्थीक तूट असल्याने दगडी दरवाजाच्या प्रस्तावित कामाला लागणारे १ कोटी ७५ लाख रूपयांचे  काम  पूढील आर्थिक वर्ष मार्च नंतरच सूरू होईल. 
             - खा.उन्मेश पाटील

 
 या परिसरातील नगरसेविका सौ. कल्पना चौधरी यांच्या सासूंचे निधन झाल्याने खा.पाटील हे द्वारदर्शनाला आले होते. त्यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य पंकज चौधरी यांनी हि समस्या त्यांना सांगीतली तर स्वतः खासदार सूमारे १५ मिनटे या परिसरात ट्राफिक जाम मूळे अडकले होते. त्यांना ही समस्या दररोजची असल्याचे माजी नगराध्यक्ष सुभाष चौधरी यांनी सांगीतले. त्यावर खासदारांनी तात्काळ संबधीत अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क करीत तात्पूरती साखळी चैन रिलींग लावण्या बाबत कामाला सूरूवात करण्याचे आदेश दिले. यावेळी पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार,भाजपाचे माजी जि. प. सदस्य अँड. व्हि.आर.पाटील, झूलाल पाटील, पंडीत चौधरी ओबीसी सेलचे तालूकध्यक्ष प्रल्हाद पाटील,योगराज संदानशिव, धनू महाजन आदि उपस्थित होते.

No comments

Don't Miss
© all rights reserved
Copyright © 2021 Amalner Headlines