अमळनेर - कोरोना आजाराची साखळी खंडीत करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासन व व्यापारी बांधवांच्या संयुक्त प्रयत्नांचा भाग म्हणून जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात येथील उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे यांचे दालनात व्यापारी संघटना प्रतिनिधी व प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत दर सोमवारी जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार दर सोमवारी जनता कर्फ्यु पाळण्यात येत आहे.
मागील आठवड्यात मंगळवार दि. १८ ऑगस्ट रोजी पोळा सण असल्याने सोमवार ऐवजी मंगळवारी जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. पण आता याआधी ठरल्याप्रमाणे सोमवारी जनता कर्फ्यु पाळण्यात येणार आहे. त्यानुसार सोमवार दि. २४ ऑगस्ट रोजी अमळनेर शहरात जनता कर्फ्यु पाळण्यात यावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
अत्यंत महत्वाचे काम असल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. मेडिकल्स् ,रूग्णालय,
कृषी विषयक सेवा पुरविणारी दुकाने,दुध विक्री या अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. व्यापारी बांधवांनी शासन निर्देश पाळण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन नपाचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी केले आहे.
No comments
Post a Comment