-----------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------
अमळनेर - शहर व तालुक्यातील कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या आधी शनिवारी जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.पण त्याबाबत पुनर्विचार करण्यासाठी आज सकाळी ११ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. अमळनेर शहरात दि.६ मार्च पासून दर शनिवारी जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आठवडे बाजार सोमवारी असल्याने व जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय झाला असल्याने अमळनेर येथील जनता कर्फ्यु कोणत्या दिवशी असावा याबाबत पुनर्विचार करण्यासाठी आज दि. ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस व्यावसायिक, व्यापारी,भाजी व फळ विक्रेते यांनी कोविडच्या नियमांचे पालन करीत उपस्थित रहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
No comments
Post a Comment